माझा वाद विठ्ठलाशी नाहीच मुळी, त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. आजपर्यंत
बडव्यांमधूनच मी माझ्या विठ्ठलाचं दर्शन घेत आलोय. पण हे मंदिर माझ्या विठ्ठलाचं, बडव्यांचं नाही...
अजुनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची,
कुणाचीही हिम्मत नाही "मराठीला" संपवण्याची,
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,
आणि "मराठी" शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातील
मी मराठी माणुस
कधीच भूकेपोटी पाठीत वाकलो नाही मी
कधीच लाचारांच्या पंगतीत बसलो नाही मी
अंधार उजळण्यासाठी शब्दांच्या ज्योती झालो मी
अन कधीच आभासांच्या वार्याने विझलो नाही मी
मी जेव्हा पक्षाचा विचार करत होतो तेव्हा एकच विचार माझ्या मानत आला. माझ्या पक्षात काम करणारा जो कार्यकर्ता असेल त्याच्या घरी त्याची आई, त्याचे वडील ,त्याची बहीण, त्याच्या भाऊ , त्याची बायको ,त्याची मुल यांच्या चेहर्यावर एक प्रकाराच समाधान असल पाहिजे. हा राज ठाकरे बरोबर काम करत आहे ,हा कुठेही वाया गेला नाही मुलगा
जय महाराष्ट्र

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top