कविता पोस्ट करता करता
अशीच एकीशी ओळख झाली...


तिच्या कवितेला रिप्लाय देता देता
ही ओळख फ्रेंड रिक्वेस्ट पर्यंत जाउन पोहचली...


फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट झाली
जी-टॉक वर आमची एक-मेकाशी बोलायला सुरुवात झाली,
एक-मेकांची ओळख पटताच
मन आमची एक-मेकाना ओळखु लागली ....


बोलणे आमचे दरोज होत होते,
मन आमचे तेवढेच जवळ येत होते...


एखाद्या ओळखिच्या व्यक्तीने प्रेम न द्यावे,
त्याहुन अधिक एक अनोलखी व्यक्ति ने आपल्यावर प्रेम करावे....


तिच्या विचारताच रात्र घालवावी....
सकाळ होताच ती ऑनलाइन येण्याची वाट पहावी..


ती आल्यावर कालचा दिवस कसा होता याची विचारपूस करावी
तिच्याशिच आधी बोलून मग आपल्या दिवसाला सुरुवात करावी..


ऑफिस नंतर ही तिच्याशी बोलायची अफाट इच्छा व्हावी
पण तिला तिचा नंबर मागायची हिम्मत न व्हावी..


दरोज बोलायची आपल्याला सवय लागावी
पण ही सवय मनाला आनंदायी व्हावी..


तिच्याशी बोलताच सार्या दुखाचा विसर पडावा
नव्याने पुन्हा जगायचा जोश जणू अंगात यावा..


फिरत होतो सर्वत्र एक मैत्रीसाठी
देव आहे दुनियेमधेय पाठवले तिला माझ्यासाठी...


असे जणू का होते
एखाद्या अनोलखी व्यक्तिमुले सारे जीवन पालटून जाते...


आमचे हे नाते असेच राहुदे
तिच्या मैत्रीची साथ मला अशीच आयुष्यभर मिळत राहुदे...


अंतरावर असुनही जवळ असल्यासारखी वाटावी
अशी एक मैत्रीण आयुष्यात प्रत्येकाला मिळावी....प्रत्येकाला मिळावी....!

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top