मनातील तुझ्या विचारांना
आवर कसा रे घालु,
तूच सांग अजून किती दिवस
तुला नुसतंच स्वप्नात पाहू.

भेटशील कधीतरी याच आशेवर
अजूनही मी रे जगतेय,
नजर का गर्दीत दरवेळी
तुलाच जिथेतिथे शोधतेय.

ये ना आतातरी समोर
का इतकं सतावतोस,
जाणून बुजूनच ना रे
तू हे सर्व काही करतोस.

म्हणूनच ठरवलंय मी हि
आता माझ्याच मनाशी,
समोर येत नाहीस तोपर्यंत
जा कट्टीच तुझ्याशी.

कवयित्री:- संतोषी साळस्कर.



टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top