******************************************

शब्दांनी कधितरी
मझी चौकशी केली होती
मला शब्द नव्हे
त्यामागची भावना हवी होती

******************************************

स्वप्नातील पावलांना
चालणे कधी कळलेच नाहि
पाऊलवाट चांगली असली तरी
पाऊल हे वळलेच नाही

******************************************
अस्तित्वाची किंमत
दूर गेल्याशिवाय कळत नाही,
सगळ कळतय मला
पण तुला सोडून दुरही जाववत नाही

******************************************

कधी कधी जवळ
कुणीच नसावसं वाटतं
आपलं आपण
अगदी एकट असावसं वाटत....

******************************************

भरल्या होत्या इथे हजार मैफ़ीली
सुर माझा कधी वाजलाच नाही
मी खेळलो कीत्येकदा रंग स्वरांचा
पण रंग माझा कुणासही लागलाच नाही…

******************************************

लिहून दाखवले तरी कळले  नाही,
बोलून दाखवले तरी कळले नाही,
तू त्याच्या सोबत निघून गेलीस तेव्हा कळले,
ते तुज्या पर्यंत कधी पोहचलेच नाही…

*******************************************

चंद्राबरोबर चांदनी एकच असते
पण तीचं नक्की सांगता येत नाही
त्याला रोज बदलताही येइल पण
तीला ते जमणार नाही

*******************************************

दिवसा वरती दिवस उलटले
आठवीनीच्या संगती
जीवन हे असेच संपले
अपुर्या इच्छा संगती
आयुष्च तर पूर्ण झाले
पण अधुर्या नात्यां संगती

*******************************************

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top