दु:खानंतर सुख आल्यावर
माणूस जरा गोंधरतो
"असं अचानक सुख का?"
असं देवाला विचारतो

आधीतर दु:खी माणसाला
सुख ओळखताच येत नाही
नशिब इतकं दयावान का?
याचं कारण कळत नाही

दु:खाची सवय झाली की
सुख विचित्र, नकोसं वाटतं
नशिबाने दाखवलेली दया
स्वाभिमानाला सुख नकोसं वाटतं

"आपण आपल्या दु:खात बरे, या
उशीरा येणाऱ्या सुखाची गरज काय?
कदाचित आपण सुखाच्या लायक नाही
अशा हावरटपणाची गरज काय?"

खरंतर देवाने दिलेलं हे बक्षिस
आपण प्रेमाने स्विकारायचं असतं
पुढे परत हवंतेवढं दु:ख
दोन क्षण सुखात जगायचं असतं



टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top