प्रिय मित्रानो,

        आतापर्यंत मन माझे ग्रुपकडुन ज्या मदत योजना राबवण्यात आल्या, तुम्ही सर्वांनी त्या उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे शतशः ऋणी आहोत. 🙂🙏🏻💐

यंदा स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही आधारवड बालकाश्रम मदत योजना हाती घ्यायचे ठरवले आहे. १५ ऑगस्ट रोजी कल्याण येथील आधारवड बालकाश्रमाला आपण भेट देणार आहोत. आपण या ठिकाणी अन्नदान, किराणा सामान, भेट वस्तू आणि देणगी द्यायचे ठरविले आहे.

           आधारवड बालकाश्रम येथे अंदाजे ५३ मुले आहेत आणि या उपक्रमासाठी लागणारी मदतीची यादी पुढील प्रमाणे आहे :

किराणा सामान:

तांदूळ ३० किलो 

तूरडाळ १० किलो 

साखर १० किलो 

गव्हाचे पीठ १० किलो 

तेल १५ लिटर 

छोले ५ किलो 

मूगडाळ ५ किलो 

चणे ३ किलो 

गरम मसाला १ किलो 

लाल मिरची पावडर १ किलो 

हिरवे वाटणे २ किलो 

सुके फरसाण 

साबुदाणा ३ किलो 

शेंगदाणा ३ किलो 

पोहे ५ किलो 

रवा ५ किलो 

मटकी - २ किलो

चवळी - २ किलो

अख्खा मसूर - २ किलो

बेसन पीठ - ५ किलो

गूळ - २ किलो

खोबरेल तेल बॉटल

फेस पावडर 

अंघोळीचे साबण 

शॅम्पू बॉटल 

कोलगेट

कपडे धुण्याचा साबण 

फिनाईल 


इतर वस्तू व मदत:


जुनी किंवा नवीन गोष्टीची पुस्तके

एक दिवसाचे अन्नदान - ४००० ₹

एक महिन्याचे  दूधदान - ६५०० ₹ 

तरी आम्ही सर्वांना नम्र विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी ज्या सभासदांना आणि हितचिंतकांना सामील व्हायचे आहे किंवा मदत करावयाची आहे त्यांनी 9869257808 नंबर वर Gpay/Paytm द्वारे मदत पाठवू शकता.

आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत. 🙏🏻

नोंद : जे इव्हेंट ला येणार आहेत त्यांनी शक्य असल्यास सफेद,भगवी किंवा हिरवी वस्त्रे तिरंग्याच्या सन्मानार्थ परिधान करावी

आभार

मन माझे 💐🙏🏻

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top