हस-या चेह-याआड लपवून
मनातील आपल्या वेदना,
वाट पाहत होती राजपुत्राची
एक शापित राजकन्या.

आयुष्यभर एकटेपणाचा
होता तिला शाप,
कळत नव्हते तिलाच
काय केले होते तिने पाप.

मनापासून केले प्रेम
हाच का झाला गुन्हा,
कधीच येणार नाही का
तो राजकुमार तिचा पुन्हा?

अर्ध्यावरच सोडून गेला
तो प्रेमाचा डाव,
मागे फक्त शिल्लक ठेवले
त्याने आठवणींचे गाव.

त्याच आठवणींच्या जगात
स्वत:ला ती सावरतेय,
बेधूंद होना-या मनाला
वेळोवेळी आवर घालतेय.

मोकळी करून देवून
डोळ्यांतील अश्रुंची लाट,
ठरवले तिच्याही मनाने
एकटीनेच चालायची हि वाट.

कवियत्री: - संतोषी साळस्कर.



टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top