नकळ्त जूळ्ले  नाते तुझे नि माझे, 
कसे ते उमगलेच नाही..........
आठवणींच्या हिंदोळ्यातून वाट काढीत, 
कधी सवय लागली तुझी, कळ्लेच नाही.......



तुला न पाहता, 
तुझी चाहुल मनाला लागत आहे...... 
अजुन एक क्षण, 
फक्त आठवन तुझी मी मागत आहे.....

 
कशी असशील तु, 
हे अजुनही मला ठाउक नाही,
पण  सुंदर असाविस मोगर्यासारखी, 
यात तीळभर वाद नाही...... 



विचार करुनही मन थकले, 
कि सहवास तुझा कधी लाभेल......
आयुष्य संपून जाईल कधितरी, 
आणि आठ्वणीवर मला जगावं लागेल......


साभार - कवी: प्रथमेश राउत

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top