एकदा एक प्रवासी जोडपे एका बसमधून पर्वतीय प्रदेशातून प्रवास करीत होते. बराच
प्रवास केल्यावर एका ठिकाणी त्यांनी बसमधून उतरण्याचा निर्णय घेतला. ते प्रवासी
जोडपे उतरल्यावर बस पुन्हा सुरु झाली आणि आपल्या मार्गाला लागली. काही अंतर
गेल्यावर त्या बसवर डोंगरातून गडगडत येणारा एक मोठा दगड पडला आणि त्याने बसमधील
सगळ्या प्रवाशांचा मृत्यू ओढवला. हे दृश्य पाहून त्या बसमधून उतरलेल्या प्रवासी
जोडप्याने म्हटले,.......अरेरे ! हे काय झाले. आम्ही त्या बसमध्ये असतो तर बरे
झाले असते.........

तुम्हाला काय वाटते, त्या जोडप्याने असे का म्हटले असेल?..........

जरा डोके खाजवा ............

काय म्हणता डोके चालत नाही.

अरे ! अशी हार मानू नका.........

थोडे आणखी प्रयत्न करा. उत्तर नक्की सापडेल.

काय म्हणता उत्तर सापडत नाहीय.

ठीक आहे

उत्तर आहे..........


जर का ते जोडपे उतरण्याऐवजी त्या बसमध्येच असते, तर त्याना जो उतरण्यासाठी वेळ
लागला तो न लागता, बस न थांबताच तशीच पुढे गेली असती. परंतू तसे न होता, बस
त्यांना उतरविण्यासाठी काही वेळ तेथे थांबली. त्यामुळे झाले काय की तिला थोडा
वेळ लागला. हा जो मधला वेळ होता तो ती बस तेथे त्यांना उतरण्यासाठी थांबली नसती
तर लागला नसता. म्हणजेच ती बस दगड पडण्याच्या वेळी तेथे नसती. ती काही अंतर
पुढे गेलेली असती. आणि म्हणूनच हा अपघाताचा प्रसंग आलाच नसता.

याचाच अर्थ असा की जीवनामध्ये नेहमी सकारात्मक विचार करा आणि दुस-यांना मदत
करण्यासाठी सदैव तत्पर रहा.

जीवनामध्ये बरेच वेळा यशाच्या विरोधी अपयश नसून, हाती घेतलेले कार्य अर्धवट
सोडून जाणे असते. (म्हणजेच पलायन होय.)

विजेता कधीच पळून जात नाहीत आणि पळून जाणारे कधीच विजेते होत नाहीत.

काही गोष्ठी तुमच्या मनासारख्या घडतील याची वाट पाहू नका. त्यासाठी झगडा,
झटापटी करा आणि त्या घडवून आणा.

तुम्हाला जीवनामध्ये किंमत मिळेल याची वाट पाहू नका. तुम्ही तुमची स्वत:ची
किंमत स्वत:च निर्माण करा!!!

टिप्पणी पोस्ट करा Blogger

  1. ज्यावेळेस माणसाला स्वतःसाठी जगायचे असते ना तेव्हा त्याला जसे पाहिजे तसे मिळत जाते असेही नाही, आणि जो माणूस निस्वार्थी पणाने इतरांसाठी काहितरी करण्याचा प्रयत्न करतो किंवा तसे करण्याची इच्छा करतो तेव्हा त्यातल्या काही गोष्टी होतात किंवा नाही हे देवालाच माहिती... त्याची इच्छा पुर्ण होते किंवा नाही... पण हे करीत असताना देखील स्वतःच्या मनाला समाधान मिळावे... की गरजू व्यक्तीला समाधान मिळावे म्हणून तो करतो...
    हाच प्रश्न मला पडतो....
    जेव्हा सरळ मार्गाने चालायचे असते तेव्हा लोक चालू देत नाही... पैसे असले की सगळे असते. हा विचार तेव्हा सत्य वाटायला लागतो... माणूस आणि माणसाचे विचारही त्याच्या चांगल्या वाईट अनुभवावरून तो ठरवित असतो, आणि तसेच वागायला त्याला भाग पाडत असतात, असे का... तेव्हा तो स्वतःसाठी जगतो की इतरांसाठी ... आणि त्यावेळेस त्याचा हा विचार कुठे जातो...
    हाच प्रश्न मला पडतो....
    रोज असेच वाटते की आज तरी माझे स्वप्न पुर्ण होईल, हो मी पुर्ण पणे स्वार्थी पणाने विचार करतो... जन्म आणि मरण आपल्या हातात नसते, मग हे मधले आयुष्य का स्वार्थी पणाने जगायचे , हो भरलेल्या पोटी हे विचार सुचतात, असे लोक म्हणतात, पण माणुस हे एकतर खुप शिकल्यामुळे किंवा अधिक दुखावल्यामुळेच बोलु शकतो...
    हाच प्रश्न मला पडतो....
    पण मलाही एक स्वार्थी माणूस म्हणून इतरांवर , माझ्या माणसांवर प्रेम करायचे आहे, लोक काहीही म्हणाले तरी चालेल, असेही माणूसकी आणि प्रेम ह्याची व्याख्या बदलली आहे... आणि आत्ताच्या जगात ह्या दोनही शब्दांना किती अर्थ उरला आहे...
    हाच प्रश्न मला पडतो....


    उत्तर द्याहटवा
  2. अंदाज आपला असावा
    शिकवनही आपलीच
    स्पर्धा आपली असावी
    ती ही आपल्याशीच

    उत्तर द्याहटवा

 
Top