समीरपाटील हा कॅउम्प्युटर इनजीनिइर होता. नुकताच इंग्लंड वरून आला आणि
त्याचेआई बाबा त्याला लग्न कर म्हणून मागे लागले. इतके दिवस तो परदेशी
जायचयम्हणून टालात होता पण आता कसलाही बहाण उरला नव्हता. ठरलं तर मग,
"आपणशुक्रवारी पूजा च्या घरी जायचं समीर चे बाबा म्हणाले आणि सर्व
आप्तमंडळीनी होकार दिला. समीर चा भाऊ विशेष खुश होता.
त्यानं कित्तेक वर्ष्या पासून ठरवलं होत कि तो भावाच्या लागन्नात काय
शिवणार आणि कोणता रंगाचा कोट घालणार.
ठरल्या प्रमाणे दुपारी सुमारे २ वाजता, समीर, समीर चे बाबा आणि आई
आणित्याचा भाऊ सर्व जन पाहुण्या मंडलींच्या घरी हजार झाले. समीर च्या
मनातविचार आला कि हि मुलगी जेमतेम शिकलेली. तिला धड इंग्रजी बोलता येत
नाही.आपण यीला नाही म्हणूयात आंनी सोपस्कार म्हणून काही तर
प्रश्न्याविचारुयात.
सर्व मांडिली बसल्या नंतर थोड्याच वेळात पाणी घेऊन एक छोटीशी मुलगी आली.
ती नक्कीच मुलीची लहानी बहिण असावी, समीर विचार करत होता.मुली कडची सर्व
मंडळी त्याच्या कडेच पाहत असल्या मुळे तो शरमून खालीच नजरटाकून बसलेला
होता जणू मुलगी येणार आणि त्यालाच प्रश्न विचारणार होती.
म्हध्यास्ती असलेल्या एकाने टी. वी चालू केला. सर्व जन टी. वी. कडे
बघतबसले. समीर ला जणू काही असा वाटल कि त्याची न्यायाधीशाने निर्धोष
मुक्तताकेली आहे. थोड हलक वाटायला लागल त्याला. एकदाच लवकर पोहे उरकून
आणि काईनाही ते प्रश्न विचारून, घरी जाऊन मस्त बाईक वर मित्र कडे जाऊन
बसून रहावअसा त्याचा विचार होता. त्याला लग्न टाळण्या मागे एक कारण होता.
ते म्हणजेतो फक्त २५ वर्ष्यांचा होता आणि त्याचा एका देखील वर्गमित्रच
लग्न आणखीझालेलं नव्हत. इतकच काय कोणी लग्नाचा विचार देखील करत नव्हत.
१० - २० मिनिट नंतर एक २० वर्ष्याची मुलगी पोहे घेऊन आली. समीर ने
वरतीतिच्या कडे न बघतच पोहे घेतले आणि तो खाऊ लागला. सर्व मंडलींची पोहे
खाऊनझ्याला नंतर एक पाहुणा म्हणाल ठीक आहे आम्ही येतो आता. समीर ला वाटल
चला,प्रश्न्न उत्तचाचा कार्यक्रम न सहन करता आपण सुटलो. पण समीर चे
बाबाम्हणले आहो आमचा समीर जरा लाजरा आहे.
त्याला आणि मुलीला थोड बोलू द्या, एक मेकांची आवड निवड कळू देत. समीर ला
तर वाटल जस खटला पुन चालू झालाय कोर्टात आणि पुन्हा त्यालान्यायाधीशाला
सामोरे जावे लागणार. सर्वांनी समीर च्या बाबाच्याम्हनंण्याला दुजोरा
दिला.
मुलीला बोलावण्यात आल. मुलीगी आली आणि समीर समोर येऊन बसिली. मुलीचे
वडीलम्हणाले विचार तुम्हाला काही प्रश्न असतील तर. समीर च्या बाबांनी
समीरलासर्व मंडली समोर सुनावलं म्हणाले...समीर, विचार आता तुला काई
विचारायचंते, शेवटी तुम्हा दोखांची पसंती महत्वाची. सर्वी मंडळींनी,
ज्याना आतापर्यत फक्त पोहे खाण्याच काम होत त्यांनी लगेच होकार भरला.
समीर ने प्रश्न विचारण्यासाठी वर मान केली आणि क्षण भर तो फक्त
बघतराहिला. आई बाबा जेव्हा त्याला विचारी अरे बाबा..तुला मुलगी कशी
हवीतेव्हा तो काही सांगू शकत नाहे. त्याला कधी शब्दात माहित नव्हत
आपल्यालाकशी मुलगी हवी. पण समोर जी मुलगी बसली होती ति त्याचा
जवळनसलेल्या शब्दाचप्रत्यक्ष रूप होती. कुठे तरी मनात प्रत्येक तरुण
आपल्याला हव्या असलेल्यास्वप्नासुन्दारीची प्रतिमा तयार करतो....ती मुलगी
त्याची ति प्रतिमा होती.
अशी मुलगी जर आपल्याच जातीत आहे तर मग का सर्वांचा रोष पत्करून
प्रेमविवाह का करावा. एक क्षणात ते घर त्याला चित्रपटातलं लोकेशन वाटू
लागल.दुसरे सर्व पाहुणे , मुलीचे आई बाबा त्याला बघत असतील याचा त्याला
विसरपडला. त्याला वाटल आताच बाबांना सांगाव...मुलगी मला पसंत आहे,
आताचलग्नाची तारीख नक्की करा, पण तो ईन्ज्नीयर होता शिवाय लंडन रिटरन.
त्यालाथोडा भाव खावा लागत होता. त्याने मुलीला शेवटचा प्रश्न्या विचारला
कि "मीतुला पसंत आहे का?"
मुलीने लाजून खाली मान घालूनच होकार दिला. तिच्या गालावरच हसू सर्व
काहीसांगून गेल होत. त्या हसण्याला बघून समीरला त्या गाण्यातल्या
ओळीआठवल्या...जन्मात लाभे क्षण एकदा हाते भाग्य माझे झालीस तू.....दिसलीस
तू फुलले तृतू.
प्रश्न्या उत्तर झाल्या नंतर समीर चे काका ज्यांना समीर वर जास्तचअभिमान
होता त्यांनी मुलीच्या बाबांना सांगितले आम्ही ५ - ६ दिवसामध्येतुम्हाला
निर्णय कळवू. समीर ला वाटले आताच काकांना म्हणव...काका, तुमची मीआयुष्य
बर सेवा करीन पण हे लग्न पक्क करा. पण, रीतीप्रमाणे आताच सर्वबोलणी होणार
नवती.
२ दिवसांनी समीर आपल्या ऑफिस च्या गावी परतला. त्याला नन्तर
बाबांनीसांगितले कि, काकांनी जी मागणी केली ती त्यांना मान्य नवती म्हणून
आपण नाही म्हणून सांगितला आहे.समीर ला काही बोलवेना...त्याच्या स्वप्नातली
ती परी त्याला पुन्हा कधीच भेटणार नव्हती. तिने समीर ला सांगितले देखील
नाही कि हि त्याचीशेवटची भेट आहे आणि ती त्याच्या दुनयेतून निघून गेली.
तिचा चेहरा देखीलत्याला आठवत नव्हता ...आठवत होते ते फक्त तो जगलेले ते
क्षण.....समीर ने कधी विचारही केला नव्हता , ज्या मुलीला पाहायला जायला
आपण तयार नव्हतो....ती मुलगी त्याच्या जीवनात येवढ काही देवून जाईल किंवा
सर्व काही घेवून जाईल.

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top