तुझ्याशी काय काय बोलायचं,
हे आधीच मनाशी ठरवून येते...

पण तू समोर आल्यावर मात्र,
सारं काही एका क्षणात विसरून जाते !

मनात साठवलेले शब्द,
तुला पाहिल्यावर मनातच राहतात...

मनातील भाव मग हळूच,
डोळ्यांमध्ये उतरतात !

सुरू होते मग नजरेची भाषा,
जी कळते फक्त तुला नि मला...

वाटते असेच हरवून जावे तुझ्या डोळ्यात,
विसरून साऱ्या जगाला !!!

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top