तू बोलत नाही काही
अन् मी ही बोलत नाही
पण क्षण आठवांचे
गुणगुणतात काही



अबोल शब्दातही
प्रीतीचा एक अर्थ आहे
माझ्या मनाच्या स्वप्नासाठी
माझे प्रेम नि:स्वार्थ आहे...............


जीवन कसे पक्ष्यां सारखे असावे
कुठे ही उडावे आणि कसे ही जगावे
आणि मरताना देखिल कधी कुणावर
आपले ओजे न देता जावे


माझ्यासाठी प्रेम म्हणजे
मोठ्ठ कुतूहल आहे
पडले नाही तरी लागते
अशी एक चाहूल आहे


आठवणींच्या मागे धावलो
कि माझं असंच होतं.
आठवणीं वेचत जाताना,
परतायचं राहुन जातं.


जळुन तृप्त होतो गुलमोहर,
तरी पाउसाची भेट नाही.
गुलमोहराचं जळणं,
कधीच का पावसाला कळत नाही


पाय मुकेच चालतात,
परी मन आठवणींना ठेचाळते.
नजरे समोर गाव तुझे अंधुक,
अन ही वाट स्वप्नांकडे जाते.


आपली पहीली भेट.. नवी ओळख..
एक सुगंध मनात ठेऊन गेली.
तसं पाहीलं तर अनोळखीच होतो आपण,
तरी एक बंध मनात ठेऊन गेली.


प्रेम म्हणजे काय…
हवा असलेला तिचा नि:शब्द सहवास,
नी, तिनं माळलेल्या गज-याचा
मी ऊर भरुन घेतलेला श्वास.


हिरवळीवर धावणारी पायवाट,
किती अस्मितेने वागते.
हिरवळ ओसरली की,
निपचीत पडुन पुन्हा वाट पाहते.


शब्द होऊ पाहणा-या भावनांची
जेव्हा गळ्यापर्यंत येऊनही कत्तल होते,
तेव्हा कुठे जाऊन
एक कविता जन्माला येते.

तुझा 'अनोळखी'पणा ही
आता ओळखीचा वाटायला लागला आहे.
अनोळखी 'तु' असलीस तरीही
तो माझ्या ओळखीचा झाला आहे.


तुझ्या आठवणींचा एक थेंब
नेहमी माझ्या डोळ्यांच्या कोप-यात असतो,
पानांवर दव चमकावे
तसे नजरेत माझ्या चमकतो.

खुणवीत आहे काही
तिळ तुझ्या गालावरचे,
मलाच समजत नाही
ते शब्दात कसे सांगायचे.


फुल कधी म्हणत नाही की
सुगंध नेहमी वा-यावरच फिरतो,
कारण, त्यालाही माहीत असतं
कितीही दुर गेला तरी तो फुलाचाच असतो.

पानांवर सठलेल्या थेंबासारखे
रंग मैत्रीचे,
रोजरोज भांडुण घट्ट होणारे
हे बंध मैत्रीचे.


असे कितीतरी बंध
जुळले असतील तुझ्या आयुष्यात…
एक बंध माझ्याही मैत्रीचे
जपशील का शेवट पर्यंत तुझ्या मनात…


कोवळ्या उन्हात न्हाऊन
नखशिखांत तु नटलेली,
जणु, सोज्वळ ती फुलराणी
ओली आताच फुललेली.


पिकलेल्या पनाला
वा-याची तमा नसते.
म्हणुनच कदाचीत
ते जास्त सळसळते.

एकांताला सोबत घेऊन
समुद्र किना-यावरुन चालताना,
वाळुनेही जागा सोडावी पायाखालुन ?
लाट माझ्यापासुन ओसरताना…!!!



संध्याकाळची वेळ
सुर्य दमुन अस्ताकडे झुकलेला,
नि:शब्द सांगुन जातो
'उगवणार आहे मी पुन्हा एकदा मावळायला'



सगळंच बरोबर करताना
काही चुका करुन गेलो,
त्यात न विसरना-या व्यक्तीलाही
मी आज विसरुन गेलो,


आठवणींतल्या आठवणींना
हळुच आठवायचं असतं.
डोळे पान्हावलेले असले तरी
मंद गालातल्या गालात हसायचं असतं.


आठवणींचा हा गुच्छ,
कोप-यात मनाच्या साठवण्यासाठी.
सोंग करुन विसरल्याचं,
पुन्हा एकदा आठवण्यासाठी.



माझ्या कविता-चारोळ्या म्हणजे,
माझ्या भावना, माझे अनुभव.
माझ्या मनाच्या पात्यावर साठलेले,
माझ्याच आठवणींचे दव.


माझ्या ओंजळीतुन
तुझ्या आठवणींची नेहमी पिसं मी उडवावी…
अलगद अशी उडुन ती,
पुन्हा माझ्याच पदरत पडावी…


माझ्या ओठावरचं हसु,
आहे साक्ष तु आठवल्याचं.
आठवणी तुझ्या आठवुन,
क्षणभर जगाला विसरल्याचं


थंडीचं एकदा
प्रेम जडलं पहाटेवर,
आजही ते एकत्र चालताना दिसतात
सकाळच्या वाटेवर.


ती वा-याची एक झुळुक
हळुच शेजारुन जाणारी,
जाता जाता पाहत वळुन
मंद गालातल्या गालात हसणारी


दिवसागन श्वास नविन
श्वासागन भास नविन
पण तुझ होकारानेच सुरु होइल
माझ्या आयुष्याचा प्रवास नविन !!!

कोमल तुझ्या चेहर-या वरुन
अश्रु का ओघळावे
गालात फ़क्त खळीने
फ़ुलायचे हे डोळ्यांनाही न समजावे ?


तुझ्या नाजुकपणावर लिहायचं म्हणजे,
मला खुपच अवघड वाटतं.
कविता-चारोळ्या तर लांबच,
'नाजुक' शब्द सुद्दा जरा जड वाटतं.


मोकळ्या हवेचा श्वास दे,
मला पुन्हा एकदा जगण्याचा भास दे.
आज चांदण्याही विजलेत बघ,
त्यान्हाही चमकण्याचा ध्यास दे.


कोणाची तरी ओढ लागली
की ओढाताण होतेच !
वणवा लागतो मनाला,
नि आयुष्याचे कोरडे रान होते.


टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top