म्हणे नाती खूप अनमोल असतात.....
जितकी मजबूत बनतात
तितकीच लवकर तुटत असतात ......
खरच ही नाती अतूट असतात का....?


जाताना म्हणतेस विसर मला
जमलेच तर आता सावर स्वत:ला
खरच प्रत्येकाला विसरणे सोपे असेल तर......
मी खरच तुला विसरू शकेन का ?

आज मारतो आहे स्वत:ला
एक नवे आयुष्य जगण्यासाठी
जगलो होतो ते नाते जपण्यासाठी
खरच मी तुझ्याशिवाय जगू शकेन का ?

अश्या अनेक कविता...

आज धूळ खात पडल्या आहेत......
तुझ्याचसाठी.....लिहिलेल्या...........
कदाचित तू त्या वाचल्या असशील............
कदाचित नसशीलही.....................

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top