तू सोडून गेल्यावर...
माझा श्वास थाम्बेल
एक थेम्ब अश्रु काढ
आणि एक दीर्घ श्वास घेउन टाक...

माझ्यानंतर
माझी आठवण काढू नकोस..
माझा विचार मनातून काढून टाक..

माझ्या पत्रांना ..
जवळ ठेऊ नकोस...
त्रास होइल..
त्या आठवणीना जालून टाक...

मी गेल्यानंतर...
माझी स्वप्न ही मरून जातील..
माझ्या स्वप्नाना...
माझ्या राखेसोबत नदिमधे वाहून टाक..

मी मेल्यावर...
कुणी विचारलं..
कोण होता तो...?
तर "एक वेडा" होता अस सांगुन टाक..

जिवलग मैत्रिण म्हणुन..
कुणी तुला विचारल..
आजार काय होता??
तर नजर झुकवुन "प्रेम" सांगुन टाक....

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top