एक शेठ होता, एकदा खुप मोठ्या सँकटात सापडला, प्राण जायची वेळ आली.
त्यान देवाला नवस केला की आता माझे प्राण वाचले तर मी माझा बँगला तुला देईन.
देव म्हणाला बँगल्याच मी काय करु ?
शेठ म्हणाला मी बँगला विकुन सारे पैसे दान करीन.
त्याचे प्राण वाचले आता नवस पूर्ण करण्याची वेळ आली.
शेठला वीस लाखाचा बँगला द्यावासा काही वाटेना.
विस लाख असेच देवुन टाकायचे काय कराव ?
त्याने ब्राम्हणाला विचारले ब्राम्हणाने मार्ग सुचवला.
अँडव्हरटाईज आली एक बकरी विकणे आहे किमँत वीस लाख रुपये आणि त्यासोबत बँगला फक्त शभँर रुपयात.
पटकन बकरी आणि बँगला विकला गेला
बगँल्याचे शभँर रुपये देवाला दिले, नवस यथासाँग पूर्ण झाला.

असा देव फसेल का ? अगदी एवढ नाही तरी थोडफार असच सारे देवाला फसवताहेत आणि त्याना वाटत की आपण केलेल्या चुका माफ होताहेत !



टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top