असं काही झालं की खूप राग येतो,
मला बोलायचे असते खूप काही,
पण त्याच्याजवळ कधी वेळच नसतो,
काहीतरी कारण सांगून का तो उगिच मला टाळतो?

असं काही झालं की खूप राग येतो,
त्याला एकटेपणा जाणवल्यावर मला जवळ करतो,
स्वत:च्या मनाप्रमाणे मग हवंतसं वागवतो,
माझ्या भावनांशी दरवेळी का तो खेळतच राहतो?

असं काही झालं की खूप राग येतो,
हवं तेव्हा तो मला आपलं म्हणतो,
वाटेल तेव्हा एका क्षणात परकं करतो,
असं असेल तर का तो माझ्या आयुष्यांतच पुन्हा येतो?

- संतोषी साळस्कर.


टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top