संक्रांतीला तिळगूळ द्यायला आलेल्या जुन्या मित्राला सुरेश आपली प्रेमकहाणी सांगत होता-
''... मी तिच्या प्रेमात पडलो हे तिला कसं कळणार...''
''का?''
''कारण माझ्यात ते सांगण्याचं धाडस नव्हतं. म्हणून मग मी माझ्या एका धाडसी मित्रामार्फत एकदा तिला फूल दिल.''
''नंतर...''
''काही दिवसांनी मित्रामार्फतच प्रेमपत्र दिल.''
''शाबास!''
''आणि आज सकाळीच संक्रातीच्या मुहूर्तावर भेटकार्ड आणि तिळगूळ...''
''स्वतः दिलेस?''
''नाही... मित्रामार्फतच दिले.''
''मग पुढे काय झालं?''
''ती त्या मित्राला म्हणाली, की तू हे स्वतःसाठी का करीत नाहीस, मी लगेच होकार देईल!''
''आणि...''
''मग काय 'दोस्त दोस्त ना रहाँ... प्यार प्यार ना रहाँ...' माझ्या प्रेमावर संक्रात आली रे!''

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top